Advertisements
चंद्रपूर – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी शासनाने अनेक नियम नागरिकांवर लादले आहे, सोशल डिस्टनसिंग, मास्क व सॅनिटायझर वापरण्यावर नागरिकांना वारंवार सूचना प्रशासन देत आहे.
आधी मास्क न लावणाऱ्यावर प्रशासन 200 रुपये दंड लावीत होता परंतु नागरिकांना सूचना देऊनही नियम पाळत असल्याने आता हा दंड 500 रुपयांवर करण्यात आला आहे.
मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीला 500 रुपये दंड:
कोरोनाची साखळी तोडणे हा सामूहिक जबाबदारीचा भाग आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी आणि कर्तव्य पार पाळावी. नागरिकांनी नियमितपणे मास्क वापरावा. यापुढे मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीला 500 रुपये दंड ठोठावण्यात येईल, असे श्री.वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.