गडचांदूर/सैय्यद मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुका हा आदिवासी,गोरगरीब, शेतकरी क्षेत्र म्हणून ओळखला जातो. हल्ली “कोरोना” व्हायरसमुळे मागील तीन महिन्यांपासून सरकारने सर्वत्र लॉकडाऊन जाहीर केले आहे.यामुळे शेतकरी व इतर नागरिकांना घराबाहेर पडता येत नव्हते.अगोदरच पोट भरणे जिकरीचे झाले.3 महिन्यांपासून रोजगार ठप्प पडले आहे.पैशाची आवक नाही,जगणे मुश्कील झाले असून त्यावर विद्युत महामंडळाने आपल्या गलथान कारभाराचा परिचय देत अतोनात विज बिल पाठवण्याचा पराक्रम केला आहे. शासनाने जाहीर केले की तीन महिने बिल भरू नका,त्या हिशोबाने अनेक नागरिकांनी विद्युत बिल भरले नाही.शासन वीज बिल माफ करेल अशी आशा होती मात्र लगेच वीज बिल पाठवून अनेकांना कोंडीत धरले असून सामान्य जनतेचे कंबरडे मोडल्याचा आरोप कोरपना भाजप तालुकाध्यक्ष तथा कन्हाळगाव उपसरपंच नारायण हिवरकर यांनी केली आहे.”हा तर तोंड दाबून बुक्क्यांचा मार” अशी परिस्थीती सध्या निर्माण झाली असून 3 महिन्याचे विद्युत बिल त्वरित माफ करा त्याचबरोबर राज्य सरकार सत्तेवर येण्यापूर्वी सातबारा कोरा करण्याची घोषणा केली होती परंतू सातबारा कोरा तर सोडाच अनेक शेतकऱ्यांचे कर्ज सुद्धा आजपर्यंत माफ झाले नाही.लोन सुद्धा मिळालेले नाही.अनेक शेतकरी बिकट आर्थिक अडचणीत सापडले आहे तरी वीज बिल माफ करून सरसकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी करत आंदोलन उभारण्याचा इशारा कोरपना भाजप तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर यांनी तहसीलदार कोरपना मार्फत पाठवलेल्या निवेदनातून दिला आहे.निवेदन देताना अनिल कवरासे,पद्माकर दगडी,निवृत्ती डोहे,दिवाकर उरकुडेसह भाजप पदाधिकारी,कार्यकर्त्यांची उपस्थीती होती.
लॉकडाऊन काळातील 3 महिन्याचे “वीज बिल” माफ करा, कोरपना भाजप तालुकाध्यक्ष हिवरकर यांची मागणी, तहसीदारांना निवेदन
Advertisements